Saturday, October 31, 2009

वाक्प्रचार

काल वडिलांकडून (माझ्यासाठी नवा, त्यांच्यासाठी जुनाच असलेला) वाक्यप्रचार समजला। "दुखऱ्या खांडकाला बांधण्यासारखा" ग्रामीण भागात खांडुक म्हणजे जखम. तर या वाक्याप्रचाराचा अर्थ असा कि तो इतका गुणवान आहे कि जखमेला बांधला कि जखम बरी होईल, गुणकारी औषधासारखा.

Friday, October 30, 2009

जग

त्याची नातं. दोन तीन वर्षांची. अगदी बारीक, अशक्त वाटण्या इतकी. त्याच्या छातीशी पेंगाळलेली. नाकातून थोडासा शेंबूड बाहेर आला होता. त्याची तिला फिकीर नव्हती. अंगात पिवळ्या रंगाचा फ्रॉक होता. तिचा आजोबा. म्हातारा. डोक्यावरचे केस तांबूस पांढरे. पान खाऊन तोंड रंगलेले. दात काही पडलेले. डोळे लाल.चेहरा उन्हामुळ रापलेला. हसला कि भेसूर दिसायचा. भीती वाटायची. पण तो आपल्या झोपाळलेल्या लाडक्या नातीला बस मधून बाहेरच जग दाखवत होता.कौतुकानं. शाळेला जाण्याऱ्या मुली, गाडया, दुकानं....

Monday, October 26, 2009

अस्वस्थ

ती माझ्या मैत्रिणीची आई. बघताक्षणी शामच्या आईची आठवण करून देणारी। शांत, प्रेमळ आई. मुलांची काळजी घेणारी. रात्रंदिवस कष्ट करणारी तरीही हसत असणारी, आई. पण मला त्यांच्याकडे बघितलं कि त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेची एक लकेर दिसते. त्यांच्या मनात काहीतरी धुमसतंय असं वाटतं. मनात कुठतरी निराशा, अशांतता आहे असं वाटतं. त्यांना कधी कशाची तक्रार करताना मी पाहिलेलं नाही, 'टिपिकल' बाय्कांसारख 'गॉसिप' करतानाही मी त्यांना पाहिलेलं नाही. पण तरीही त्यांना खूप ओरडून काहीतरी सांगायचं आहे, असं वाटतं. खूप सोसाल्याच्या वेदना त्यांच्या डोळ्यातून अनेकदा व्यक्त होतात. हे सगळे माझ्या मनाचे खेळही असतील कदाचित....पण असं वाटतं खरं. कधी कधी त्यांच्याशी खूप बोलावं, त्यांचं खूप ऐकावं असं वाटतं, पण आमचं वय, नातं आड येत असावं.

एक ठिकाण

कोल्हापूर पासून ४५-५० किमी. अंतरावरच एक ठिकाण. अगदी छोटसं गाव. फार-फार तर २५०० लोकसंखेच. (हा आपला अंदाज) हिरव्यागार झाडीत वसलेलं. लाल मातीची सुंदर दिसणारी घरं. प्रत्येक घरासमोर अंगण, समोर झाडीच कुंपण. त्यावर वाळत घातलेले कपडे. सगळंच कसं चित्रासारखं. सुंदर निसर्गचित्र. रस्ता डांबरी पण नावालाच, खड्ड्यांनी भरलेला. या गावात एका टोकाला राम मंदिर आहे. फार प्राचीन असं म्हणतात. सध्या एक खाजगी आश्रम, श्रद्धास्थान, सर्वांसाठी विना मोबदला खुलं असणारं ठिकाण. वरून पाहिलं कि हिरव्यागार झाडीनं झाकलेले उंच डोंगर. जश्या पायऱ्या उतरून जावं तसा पाण्याचा खळखलाट ऐकू येतो. थोडंस खाली गेलं कि मग दिसतात, ओबड धोबड दगड आणि नितळ, स्वच्छ , निर्मळ पाणी. मन प्रसन्न करणारं. त्यावर पाय ठेवला तर ती पातळ काच फुटून जाईल असं वाटणारं. संपूर्ण दगड खोदून ध्यानाला तयार केलेली जागा. अंधारलेली. (हे प्राचीन असावं, आता कोणी त्याचा वापर करत नसावं, हा हि अंदाज) असे तीन दगड. एका कोपऱ्यात शेवाळलेल्या दगडांच्या गुहेत शंकराची पिंड. तिथं गेलं कि वरून पाणी ठिबकत असतं. तर दुसरीकडे दोन मोठ्या दगडांच्या चिमटीतून पडणारं पाणी, थंडगार. पूर्ण भिजून जावं, असं वाटणारं. स्वच्छ पाणी आणि त्याच्या सहवासात गुळगुळीत झालेले काळे दगड. पुन्हा चित्रासारखं. तसा आम्हाला तिथं कुठ आश्रम किंवा राम मंदिर दिसलं नाही. पण त्याची फिकीर नव्हती. एकाच नजरेत सामावणारं ते ठिकाण, 'पर्यटन स्थळ' नसल्यानं अजून तरी खूप छान, स्वच्छ, मनाला स्पर्श करणारं आहे. खऱ्या निसर्गाचं खरं दर्शन घडवणारं.

Wednesday, October 14, 2009

काही माणसं...काही नाती..

काही माणसं...काही नाती...जुनीच...तरीही नव्यानं कळलेली... काही माणसं...काही नाती...अचानक...नव्या वळणावर...नव्यानं सापडलेली... पूर्वीपेक्षा...अधिक खोल आणि अधिक व्यापक झालेली....

Thursday, October 8, 2009

घाण

बस मधून जाताना दररोज दिसणारे चित्र. काही वेळा ठिकाण बदलत पण चित्र तेच. नाकाला रुमाल लावल्याखेरीज पुढे जाता येणार नाही असे कचऱ्याचे ढीग. प्लास्टिकच्या रंगीत पिशव्या, फळांच्या साली, आणि बरंच ओळखू न येणारा, कुजलेला, सडलेला कचरा, सोबत घाण वास.आणि सकाळी सकाळी हा कचरा उचलायला येणारी महानगरपालिकेची गाडी, सोबत काही 'माणसं'. दोन-तीन. या कचऱ्याच्या ढिगात उतरून, तो ढीग उपसणारी. अंगावर (नावालाच) मळकट कपडे, डोक्यावर फाटकी टोपी, बाकी विशेष काहीच नाही. त्यांच्या तोंडाला रुमाल कधीच दिसला नाही. त्यांना घाण वास येत नसेल? बघून मन सुन्न होतं. घाणीत उतरलेली ती मानसं बघून त्यांचीहि घाण वाटायला लागते. मग त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल,त्यांना असं बघून. नकोसा वाटतो असला विचार. मग ठरवून या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून बस मधली गाणी ऐकण्यात मन गुंतवावेसे वाटते.पण त्याचीही रुखरुख वाटायला लागते.

Tuesday, October 6, 2009

तो आणि ती

दोन-तीन महाविद्यालयांच्या मधला bus stop म्हणजे एक मजेशीर ठिकाण. निरीक्षण करता येइल, वेळ छान घालवता येईल अस ठिकाण.तरुण मुला-मुलींची भरपूर गर्दी,हास्याचा धबधबा,उत्साहाचा खळाळता समुद्र,चैतन्याने भरलेलं वातावरण असणारं ठिकाण.bus stop. सगळीकडे थोडेसे गोंधळलेले,काहीसे स्टायलिश,थोडेसे फिल्मी,सतत एकमेकांना टाळ्या देत बोलणारे,खिदळणारे जीव. फुललेले. या गर्दीपासून थोड्या अंतरावर,सगळ्यांपासून दूर उभे असलेले....तो आणि ती. दोघांच्याही चेहऱ्यावर तारुण्याच्या सगळ्या खाणाखुणा.उंचीला साधारण सारखेच.कॉलेजच्या युनिफॉर्ममध्ये.दोघांमध्ये सुरक्षित अंतर,जाणवेल असे. दोघेही निरागस. ती थोडीशी बावरलेली।पाठीवरच्या sack च्या पुढे आलेल्या पट्ट्याशी खेळणारी. तो तिच्या कडे न पाहता,इतरत्र बघत,हातातल्या (कदाचित नव्या असलेल्या) घड्याळाशी खेळणारा. हसत,लाजत कधी एकमेकांकडे तर कधी सभोवताली नजर टाकत बोलणारे... तो आणि ती. जगाला विसरून एकमेकांशी बोलण्यात मग्न असलेले...तो आणि ती.

Monday, October 5, 2009

एक रात्र अशीही..

मित्र-मैत्रीनि सोबत एक रात्र, स्वप्नातली।बाहेर जेवण, नऊ ते बारा पिक्चर,नंतर चालत सारस बागे जवळ मस्त गरमागरम कॉफी,ती ही दोन कप.गरम कॉफी बरोबर गरम विषय,चर्चा तर कधी वाद.रात्रीचा गार वारा,ढगाळ आभाळ , धूसर दिसणारा चंद्र, शांत आणि ओले रस्ते, बंद दुकानं आणि आमच्या गप्पा. कधी येणारी डुलकी.एकमेकांची घेतलेली काळजी.संपता न संपणारे विषय.कधी काही गंभीर तर कधी चेष्टा,कधी भूतकाळातल्या आठवणी तर कधी भविष्याच्या गोष्टी. कधी हि न बोललेले विषय, न उलगडलेली मने, सगळ मोकळ करणारी रात्र. संपत आलेली पण तरीही बरच बोलायचं राहून गेलेली रात्र.

आठवण

तेंडूलकरच 'तें दिवस' वाचून आमची कॉलनी आठवण थोडस स्वाभाविक होत.

आमची कॉलनी. चार मोठ्या घरांच्या तीन रांगा,अशी एकून बारा घर.सगळी 'सायबांची'.पंचायत समितीमध्ये काम करणारे साहेब.सगळे साहेब कामाला गेले कि कॉलनीत आम्हा मुलांचे आणि बायकांचेच राज्य. सायबांच्या बायका. मध्यमवर्गीय,काही कमी शिकलेल्या,काही अजिबात न शिकलेल्या,नवरयाच्या नोकरीत आणि मुलांच्या मार्कांमध्ये सुख शोधणाऱ्या बायका. भाज्या खुडायला,धान्य निवडायला,लहान-सहान सण साजरे करायला आणि सल्ले मागायला-द्यायला नेहमी एकत्र. नवा पदार्थ बनवला तर सगळ्या घरांमध्ये देणाऱ्या. संध्याकाळी मात्र नवरा घरात आला कि घरातून बाहेर न पडणाऱ्या.'सुखी 'बायका.

आम्ही मुल.शाळेत नाहीतर कॉलनीत रस्त्यांवर खेळात मग्न.शाळा घरापासून हाकेच्या अंतरावर.शाळेत प्यायचं पाणी संपल कि आम्ही कॉलनीत पाणी प्यायला यायचो,इतक्या जवळ शाळा.म्हणून आम्ही खऱ्या अर्थान कॉलनितच असायचो.दिवसभर. प्रशस्त जागा असल्यान आम्ही खूप खेळायचो.विष-अमृत,वक्वास,लपंडाव,पळापळी,लगडीपळती,घर आखून जिबलीन, क्वचित कधीतरी क्रिकेट(मुलीना एक दोन बॉलमध्ये औट करून फिल्डिंग करायला लावलं जायचं) यातून वेळ मिळाला कि जेवण-पाव्हण खेळायचो,मुल-मुली मिळून.('भातुकली' हा शब्द खूप नंतर कळाला) बैठे खेळ अजून वेगळे.इतक खेळून अभ्यास करून चांगलेच मार्क मिळवावे लागायचे, कारण सायबांच्या मुलांना कमी मार्क असण,हा खूप मोठा गुन्हा होता. आणि नापास होण तर......

Thursday, October 1, 2009

ग्रंथ

ग्रंथ हेची संत । मानी बुद्धिवंत । दोहो मधे अंत । अज्ञानाचा । ग्रंथलयी जाता । चित्त शांत होई । लाभतो एकांत । भेटतो भगवंत । नुकात्याच वाचनात आलेल्या आणि भावलेल्या या ओळी

About Me

My photo
short tempered,talkative.love to watch tv.