Monday, November 2, 2009
वेगळं हिंदी
हिंदी मालिकांविषयी अनेकदा अनेकजण अनेक गोष्टी बोलत असतात. अशांपैकी मी हि एक. एकता कपूर संपली, बालाजीचा आशीर्वाद किमान आता तरी तिला मिळेनासा झाला आहे, त्यामुळे ती त्रस्त असेलच. जाऊदे, त्याची चर्चा इथे नको. तर, एकता संपली असली तरी सास- बहु संपल्या नाहीत, पण त्याचं स्वरूप बदललं आहे. म्हणजे त्यांचे कट कारस्थान अजून ही सुरु आहेच, ते कसे संपेल, त्यावरच तर टीवीवाल्यांचे TRP शिजतात. तर, आता सास-बहु फक्त शहरातल्या आणि गुजराती किंवा बंगाली राहिल्या नाहीत. आता त्या ग्रामीण (पण श्रीमंतच) भागातल्या आहेत. त्या आहेत बिहारी, हरयाणवी, राजस्तानी आणि मराठी सुद्धा. त्यामुळे आता खास भोजपुरी, हरयाणवी, मराठी टच असलेली हिंदी ऐकायला मिळते. त्यामुळे कानाला थोडं बरं वाटत. झी वरच्या 'अगले जनम मोहे बिटीयाही कीजो' मालिकेत भोजपुरी style चं हिंदी ऐकायला मिळतं. तिथल्या प्रथांविषयी, आणि बाकी मसाला तोच. पण सगळेच कलाकार भोजपुरी हिंदी मस्त बोलतात. 'ना आणा इस देस मेरी लाडो' स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधातली हरयानवी style ची मालिका. यात 'अम्माजी'चं काम करणारी अभिनेत्री भारीच (हरयानवी) हिंदी बोलते. 'क्योंकी' ची छुट्टी करणाऱ्या 'बालिका वधू' मधलं राजस्तानी बिंद-बिन्दनि वेगळं वाटतं. यातली 'दादीसा' उत्तमच. 'छोटी बहु' मधले बाउजी जेव्हा 'अपराधी को उचित दंड मिलना स्वाभाविक हैं, अतः मैं अपना कार्य अवश्यहि करुंगा' असे म्हणत रागावले तरी कानात साखर घोळल्यासारखंच वाटतं.
या मालिका खूप भन्नाट आहेत किंवा अर्थपूर्ण आहेत असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये. या मालिकांमधून वेगळ ( रुळलेलं नव्हे ) हिंदी ऐकायला मिळतं इतकच वाटतं. आणि ते हि बरोबरच असेल या बद्दलही शंका आहेच. पण तरीही....
Subscribe to:
Post Comments (Atom)
बाप रे! किती मालिकांची मालिका.
ReplyDeletehi tari kahich nahi? etakya malika aahet.
ReplyDelete