Monday, November 9, 2009
मराठी भाषा टिकणार...
मराठी भाषा टिकणार...मराठी माणूस टिकणार...
यासाठी काय करायचं? सोप्पं आहे... दुसरी कुठलीही भाषा महाराष्ट्रात बोलू द्यायची नाही। मराठी माणसाव्यतिरिक्त इतर कुणाचचं कौतुक करायचं नाही, आपलं म्हणायचं नाही. म्हणालं तर तुम्हाला मराठीचा अभिमान नाही. हिंदी सिनेमे बघायचे नाहीत, हिंदी मालिका बघायच्या नाहीत,हिंदी गाणी ऐकायची नाहीत, 'जय हो' म्हणत खूष व्हायचं नाही, रवींद्रनाथ टागोरांबद्दल अभिमान वाटू द्यायचा नाही, भगत सिंग मराठी नव्हते ना मग त्यांचा विचार करायचा नाही, आशा-लता यांनी मराठी किती गाणी गायली यावरून त्यांना थोर म्हणायचे, कोण गुलझार, कोण ए. आर. रहमान, कोण पी टी उषा, कोण बिंद्रा, कोण किरण बेदी, आम्हाला फक्त सचिन आणि सुनील माहित आहेत, ते खेळतात तेच काय ते क्रिकेट, कशाला ताज महालचं कौतुक करायचं, कुठलं हळेबिड आणि कुठलं हंपी? मराठी भाषा टिकणार...मराठी माणूस टिकणार.... आम्ही मराठी किती बोलतो, कसं बोलतो, आम्ही मराठी किती वाचतो, शाळेत मराठीच्या नावानं काय शिकवलं जातं, कसं शिकवलं जातं, याकडे लक्ष द्यायचं नाही, याचा विचार आपण करायचं नाही. याचा विचार केला आधी बाळासाहेब ठाकरेंनी, आणि आता तो करत आहेत राज ठाकरे... .मनसे...दिलसे...हाथसे...लाथसे...
Subscribe to:
Post Comments (Atom)
avadli..
ReplyDelete