Monday, September 21, 2009

दोष कुणाचा?

मामू.आमच्या सोसायटीचा भाजीवाला.४०-४५ वयाचा मुसलमान गृहस्थ.तो थेट मुख्य भाजी मार्केट मधून भाजी आणायचा ,त्यामुळ तो त्याची भाजी इतरांपेक्षा स्वस्तात विकू शकायाचा .त्याला तस करण परवडतही .स्वस्तात भाजी देणारा म्हणुन सोसायटीतल्या बायकांशी त्याच खास नात निर्माण झाल .दररोज बायका त्याची वाट बघत बसायच्या .मामून प्रत्येक बाईशी बहिणीच, वहिनीच,मावशीच नात तयार केल होत.नात...माणुसकीच. एके संध्याकाली मामू नेहमीप्रमाण भाजी विकत होता.अचानक कुठून तरी तीन bikes वरून 'शिवाजी महाराज की जय' म्हणत काही तरुण आले आणि मामुची सगळी भाजी विस्कटून टाकली. ही घटना मिरज दंगली नंतर पाच दिवसांनंतरची ,कोल्हापुरात घडलेली। ***** स्नेहल .इंचलकरंजी त राहणारी .न चुकता collegeला येणारी .खुप अभ्यासू .चौकस .काल भेटली .उदास दिसली ,म्हणुन सहज विचारल ,तर म्हणाली ,''ह्या दंगलीनमुळ दहा दिवस संचार बंदी. college बंद .बाहेर फिरण बंद .अभ्यास बंद .इतर चर्चा बंद .मित्र -मैत्रिनिशी बोलन बंद. जणू जगणच बंद.दंगल झाली मिरजेत,मग त्याचा त्रास मला, माझ्यासारख्या सामान्यना का ? आमचा काय दोष ?'' खरच दोष कुणाचा ?

1 comment:

  1. माणसे धर्मासाठी कि धर्म माणसांसाठी, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची तसदी धर्मामार्तान्दानी घ्यावी. दंगलीत महिलांवर अत्याचार करण्यारांना सुभेदाराचा सुनेची आठवण येत नाही का? कि सात वेळ नमाज अदा करताना मुलत त्ववाद्याना शिवाजी महाराजांनी एकदाही मशिदीच्या विटेलादेखील हात लावला नाही, हे स्मरत नाही का? कशासाठी हा धर्माचा बुरखा? ' सुगंधा' तुझा संताप रास्त आहे. पण सर्वसामान्यांप्रमाणे तो 'सात्विक' आहे.

    ReplyDelete

About Me

My photo
short tempered,talkative.love to watch tv.